पाषाण :
वसुंधरा स्वच्छता अभियान, पुणे यांच्या वतीने पाषाण-सूस रस्त्यावरील शुभतेज मंगल कार्यालय येथे १२ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत तीन दिवसीय नैसर्गिक शेती धान्य महोत्सव होणार आहे.
“वसुंधरा धान्य महोत्सव” हा वार्षिक कार्यक्रम असून त्याचे हे ८ वे वर्ष आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या विषमुक्त अन्नधान्याचे प्रदर्शन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच पुणेकरांना थेट शेतकऱ्यांकडून विषमुक्त उत्पादन विकत घेण्याची आणि त्याचा साठा करण्याची संधी देणे हे दुहेरी उद्दिष्ट आहे. शाश्वत आणि विषमुक्त शेतीच्या “सुभाष पाळेकर कृषी” तंत्राचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.या महोत्सवात महाराष्ट्रातील विविध भागातील शेतकरी सहभागी होतात. मोठ्या संख्येने शेतकरी उत्सवाचा भाग बनू इच्छित असतात, पण किमान तीन वर्षांपासून या तंत्राचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांचीच निवड केली जाते.
यावर्षी महोत्सवात महाराष्ट्रातील विविध भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांचे व शेतकरी गटांचे ३०+ स्टॉल्स असतील. या महोत्सवात धान्य, कडधान्ये, बाजरी आणि गूळ, देशी गाईचे तूप, लाकडी घाण्याचे तेल, माती भांडी इत्यादी शेतमालाचे वैविध्यपूर्ण मिश्रण असेल. या कार्यक्रमाचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स ज्यामध्ये विविध स्वादिष्ट पदार्थ मिळतील.
महोत्सवाचे उदघाटन सामाजिक, पर्यावरण व शेती क्षेत्रातील मान्यवर नागरिकांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सुश्री प्राची शेवगावकर (युवा हवामान-कार्यकर्त्या आणि ‘कूल द ग्लोब’ ॲपच्या संस्थापक), श्रीमती अदिती देवधर (ब्राऊन लीफ प्रकल्पाच्या संस्थापक, मिशन सिटी चक्राच्या लीड) आहेत. सन्माननीय पाहुण्यांमध्ये श्री राहुल दादा कोकाटे (सामाजिक कार्यकर्ते), श्री सनी विनायक निम्हण (माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते), श्री भास्कर कोकाटे (सामाजिक कार्यकर्ते), डॉ आरती व्यास (संस्थापक, ग्रेलॉक आयुर्वेदिक हेअर कलर), डॉ अनुराधा तांबोळकर ( भारतीय पाककृतींचे क्युरेटर, लेखक आणि Youtuber)
वसुंधरा स्वच्छता अभियान सर्व पुणेकरांना आवाहन करते की त्यांनी या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा, त्याद्वारे त्यांच्या कुटुंबाच्या चांगल्या आरोग्यासाठी एक सकारात्मक पाऊल उचलावे आणि ते करताना शाश्वत नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करावी. सुभाष पाळेकरांची नैसर्गिक शेती प्रणाली आपल्या आरोग्यासाठी विषारी पदार्थांपासून सुरक्षित अन्न पुरवते, तर त्यात तापमान वाढ आणि हवामान बदलाचा सामना करण्याची शक्ती देखील आहे. “चला थेट शेतकऱ्यांकडून वर्षभरासाठी विषमुक्त धान्य खरेदी करूया, आपले आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित करूया.” महोत्सवाविषयी अधिक माहितीसाठी, संपर्क डॉ. स्वाती (९६८९० ६३३०९) , आनंद (८२३७० ६९४५६) .
More Stories
बालेवाडी येथील साई मित्र मंडळ आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची उपस्थिती..
पाषाण येथील विश्वकर्मा मित्र मंडळाने घेतलेल्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न…
औंध येथील नेहरू तरुण मंडळ येथे शेकडो महिलांनी केले अथर्वशीर्ष पठण..