बालेवाडी :
सी एम इंटरनॅशनल स्कूल ज्युनिअर कॉलेजने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये इयत्ता बारावीच्या एचएससी बोर्ड परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. शाळेचा निकाल १००% लागला असून, विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत संस्थेची गौरवशाली परंपरा कायम राखली आहे.
विद्यार्थ्यांच्या कठोर मेहनत, शिस्त आणि दृढनिश्चयाचे हे फलित आहे. संस्थेचे व्यवस्थापन, प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाले, असे संस्थेने म्हटले आहे.
या परीक्षेत मोहम्मद शेख याने ८४.६७% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, तर अनिशा पाटील हिने ८३.१७% गुणांसह द्वितीय आणि निखिल पावडे व निरंजन बाळवडकर यांनी ८२.६७% गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला. याशिवाय अन्वेता शिंदे (८१%) आणि जयश्री पाडाळे (८०.५०%) यांनीही उल्लेखनीय यश मिळवले.
विषयवार प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचाही संस्थेने गौरव केला आहे. इंग्रजी विषयात अन्वेता शिंदे (८७/१००), गणितात मोहम्मद शेख (८४/१००), रसायनशास्त्र विषयात मोहम्मद शेख आणि निखिल पावडे (प्रत्येकी ८४/१००), भौतिकशास्त्र विषयात मोहम्मद शेख (८२/१००), हिंदी विषयात जयश्री पाडाळे (८०/१००), जीवशास्त्र विषयात अन्वेता शिंदे (९०/१००), संगणक विज्ञान विषयात मोहम्मद शेख (१७८/२००), जर्मन विषयात अन्वेता शिंदे (८९/१००), माहिती तंत्रज्ञान विषयात अनिशा पाटील आणि समृद्धी देशमुख (प्रत्येकी ९७/१००) आणि भूगोल विषयात अनिशा पाटील (८९/१००) यांनी सर्वाधिक गुण मिळवले.
या शानदार यशाबद्दल संस्थेने सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांचे मार्गदर्शक शिक्षक आणि प्रोत्साहन देणारे पालक यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमामुळेच हे यश मिळाले असून ‘१००% कठोर परिश्रम = एचएससी इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत १००% यश!’ हा संदेश त्यांनी दिला आहे.
– डॉ. सागर बालवडकर (सचिव : एस के पी कॅम्पस)


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी