पुणे :
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष आणि लेखक श्री. सुनील चांदेरे यांच्या ‘ऐकलंत का?’ या दुसऱ्या साहित्यकृतीचे प्रकाशन आज बालगंधर्व रंगमंदिर येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रकाशन सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. दत्तात्रय मामा भरणे, आमदार शंकरभाऊ मांडेकर, प्रसिद्ध साहित्यिक व कवी रामदासजी फुटाणे, चेअरमन प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे सर, पुणे जिल्ह्यातील अनेक माजी आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे माजी पदाधिकारी, पुणे जिल्हा बँकेचे संचालक मंडळ आणि श्री. सुनील चांदेरे आणि अजितदादा पवार यांच्यावर प्रेम करणारे असंख्य लोक उपस्थित होते.
बालगंधर्व रंगमंदिर लोकांच्या गर्दीने ओसंडून वाहत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनील चांदेरे यांच्या साहित्यकृतीचे कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
श्री. सुनील चांदेरे यांनी आपल्या मनोगतात उपस्थितांचे आभार मानले आणि आपल्या साहित्य प्रवासाविषयी माहिती दिली. त्यांनी अजितदादा पवार आणि उपस्थित मान्यवरांचे विशेष आभार मानले.
या कार्यक्रमाला पुणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!