June 7, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

भारताने वेस्ट इंडिज संघावर 200 धावांनी अंतिम सामन्यामध्ये विजय मिळवत मालिका २-१ ने जिंकली..

वेस्ट इंडिज :

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमधील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये कॅरेबियन संघाचा पराभव झाला आहे. टीम इंडियाकडून प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर शुबमन गिल 85 धावा, ईशान किशान 77 धावा आणि कर्णधार हार्दिक पंड्या नाबाद 70 धावा या तिघांनी दमदार अर्धशतके केलीत.

 

तिघांनी केलेल्या तुफानी अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 352 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र वेस्ट इंडिजचा संघ 151 धावांवर ऑल-आऊट झाला. लॉर्ड शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 4 तर मुकेश कुमारने 3 विकेट्स घेतल्या. टीम इंडियाने तब्बल 200 धावांनी अंतिम सामन्यामध्ये विजय मिळवत मालिका २-१ ने खिशात घातली आहे.

सामन्याचा संपूर्ण आढावा

टॉस जिंकत वेस्ट इंडिज संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. बॅटींगसाठी उतरलेले टीम इंडियाचे सलामीवीर शुबमन गिल आणि ईशान किशन यांनी 143 धावांची दमदार सलामी दिली. दोघांनीही सुरूवातीला सावध पवित्रा घेतला होता मात्र छोटा पॅकेट बडा धमाका असलेल्या किशन याने तोडफोड फलंदाजी करायला सुरूवात केली. किशनने 77 धावा केल्या मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. सगल तीन वन डे सामन्यांमध्ये किशनने अर्धशतक केलं आहे.

शुबमन गिल यानेही या सामन्यात 85 धावांची खेळी केली. अवघ्या 15 धावांनी त्याचं शतक राहून गेलं. अंतिम सामन्यामध्ये संधी मिळालेल्या रुतुराज गायकवाड अवघ्या 8 धावा करून परतला. त्यानंतर संजू सॅमसन आणि हार्दिक पंड्या यांनी कमाल फलंदाजी केली. संजूने टी-20 स्टाईल पद्धतीने बॅटींग केली 41 चेंडूत त्याने 51 धावांची खेळी केली. हार्दिक पंड्या मैदानात एक बाजू लढवत होता. मिस्टर 360 डिग्री म्हणून ओळखला जाणार्या सूर्यकुमार यादवनेही 36 धावा केल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये पंड्याने हार्ड हिंटिंग केली.

या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाची सुरूवात एकदम खराब झाली होती. भारताच्या 352 धावांचा पाठलाग करताना विंडीजची सुरूवात अत्यंत खराब झाली. भारताचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने ब्रँडन किंगला शुन्यावर, कायल मेयर्स 4 तर शे होपला 5 धावांवर बाद करत विंडजची अवस्था 3 बाद 17 अशी केली. त्यानंतर मात्र शेपडटीने भारतीय गोलंदाजांना घाम फोडला. ठाकूर आणि कुलदीपने तळाच्या फलंदाजांना माघारी पाठवत संघाच्या विजयावर शिक्कामोक्तब केलं.विंडीजचा संपूर्ण संघ 151 धावात गारद झाला. भारताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 4 तर मुकेश शर्माने 3 विकेट्स घेतल्या. या दोघांना कुलदीप यादवने 2 विकेट्स घेत चांगली साथ दिली. विंडीजकडून गुडाकेश मोतीने सर्वाधिक 39 धावा केल्या.