सुसगाव :
सुसगावातील स्मशानभूमी वर असणाऱ्या पत्र्याच्या शेड पावसामुळे खराब झाल्याने पावसात गळू लागले होते. अंत्यविधी साठी येणाऱ्या नागरिकांना, ग्रामस्थांना याचा नाहक त्रास होत होता. याची दखल घेत माजी नगरसेवक/स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी महापालिका प्रशासनासी संपर्क साधत तात्काळ गळणारे २० पत्रे बदलण्यासाठी पाठपुरावा केल्याने स्मशान भूमी वरील पत्रे बदलण्याचे काम सुरू झाले.
पावसाळ्याचे दिवस असल्याने अंत्यविधी, दशक्रिया विधी साठी येणाऱ्या नागरिकांना त्रास होणार नाही याची दखल घेत चांदेरे यांनी सदर काम त्वरित होईल यासाठी पाठपुरावा केल्याने काम सुरू झाल्याने सुस गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.



More Stories
पुणे आयडॉल २०२६ ची महाअंतिम फेरी १० मे रोजी बालगंधर्व येथे – ५६० स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘व्हॉइस ऑफ चॉईस’ विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार
राजभवन (लोकभवन) मार्ग विस्तारीकरणाला गती; कामाचा शुभारंभ, वाहतूक कोंडीवर लवकरच दिलासा – नगरसेवक सनी निम्हण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा