September 8, 2024

Samrajya Ladha

छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राजाभिषेकाचे औचित्य साधून मावळ-मुळशीतील मावळे लेह ते कन्याकुमारी सायकल प्रवासासाठी रवाना..

बाणेर :

छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राजाभिषेकाचे औचित्य साधून आपल्या मावळ-मुळशीतील जिगरबाज मावळे ”लेह(खारदूंगला पास) ते कन्याकुमारी” असा तब्बल ४२८० किलोमीटर सायकल प्रवास करणार आहेत.

 

सदर मोहीमेसाठी कु.जयेश संजयनाना मुरकुटे सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मोहीमेची सुरुवात बाणेर येथील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन, रुग्णवाहिका आणि सायकल पुजन करून झाली आहे.

परिसरातील बहुसंख्य युवक नागरीक या जिगरबाज मावळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी उपस्थित होते.