सुस :
नागरिकांचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि वाहतूक कोंडीमुक्त व्हावा या उद्दिष्टाने सूस–नांदे आरपी रोडवरील सनीज वर्ल्ड परिसरात रस्ता रुंदीकरणाचे महत्त्वाचे काम सुरू करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार तब्बल ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून या कामाला गती देण्यात आली असून उद्या या कामाचा औपचारिक शुभारंभ होणार आहे.
आज या कामाचा प्रत्यक्ष पाहणी दौरा स्वतः माननीय अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष समीर चांदेरे उपस्थित होते. साईटवरील नियोजन, मोजमाप, वाहतूक व्यवस्थापन, गुणवत्ता नियंत्रण यांचा सखोल आढावा घेण्यात आला.
वाहतुकीचा अभ्यास आणि सुरक्षाविषयक सूचना
या दौऱ्यात वाहतूक कोंडीचे मुख्य ठिकाणे, वळणांवरील धोकादायक पॉईंट्स, चढ-उतार तसेच भावी लोकसंख्या आणि वाहनवाढ यांचा तपशीलवार अभ्यास करण्यात आला.
माननीय अजितदादांनी
रस्त्याचे टिकाऊ स्वरूप,
सुरक्षितता वाढवणे,
अपघातांचे प्रमाण कमी करणे,
वाहतुकीचा प्रवाह सुरळीत करणे
यांसाठी आवश्यक उपाययोजना प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि बाबुराव चांदेरे यांना स्पष्टपणे निर्देशित केल्या.
परिसरातील नागरिकांसाठी मोठा दिलासा
सूस, नांदे, म्हाळुंगे, बाणेर–बालेवाडी परिसरातील हजारो नागरिकांना या रस्ते रुंदीकरणामुळे दीर्घकाळ भेडसावत असलेल्या कोंडीपासून मोठा दिलासा मिळणार आहे. विद्यार्थ्यांचा प्रवास, कार्यालयीन वाहतूक, व्यापारी व्यवहार अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहेत.
दूरदर्शी नेतृत्वाचा उत्तम नमुना
रस्ता फक्त तयार करणे नव्हे, तर तो दर्जेदार, टिकाऊ आणि उपयुक्त असावा हा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा नेहमीच स्पष्ट आग्रह. कामाची गुणवत्ता, वेळेत अंमलबजावणी आणि जनहिताला प्राधान्य देणारे त्यांचे नेतृत्व या प्रकल्पातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
या पाहणी दौऱ्यावेळी सुस गावातील ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते. माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा हा प्रवाह अधिक वेगाने आणि सातत्याने पुढे जात राहील, असा दृढ विश्वास व्यक्त करण्यात आला.





























More Stories
मैत्रीचा धागा, विश्वासाचे नाते! युवा स्पंदनतर्फे चतुःश्रुंगी व कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये फ्रेंडशिप डे उपक्रम
*”‘मोठी स्वप्ने पाहा… भारत घडवा!’ — भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणादायी विचारांचा वारसा बावधन येथील पेरीविंकल च्या विद्यार्थ्यांपर्यंत !!!!*
सेवाकार्याला सर्वोच्च प्राधान्य द्या : चंद्रकांत पाटील संत अच्युत महाराज गुरुपौर्णिमा उत्सव, प्रतीकचिन्हाचे व संकेतस्थळाचे विमोचन