February 5, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

औंध येथे संपन्न झाला सामुहिक तुळशी विवाह सोहळा..

औंध :

औंध येथील रणवीर हनुमान तरुण मंडळ (वरची तालीम) यांच्या वतीने प्रथमच आगळ्या वेगळ्या पध्दतीने सामुहिक तुळशी विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता.

हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला धार्मिक दृष्टिकोनातून अतिशय पवित्र मानले जाते. दरवर्षी कार्तिक मासातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी पासून ते पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह शाळीग्रामसोबत करण्याची परंपरा आहे. हि परंपरा राखण्यासाठी औंध गावातील पहिले मानाचे मंडळ असलेल्या या मंडळाच्या वतीने हनुमान मंदिराच्या प्रांगणात सामुहिक तुळशी विवाह सोहळा संपन्न झाला.

या सोहळ्याचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष विशाल गायकवाड, विनोद बोडके, समीर खताळ, दीपक मदने, कुणाल पवार, रोहन शिंदे यांनी पुढाकार घेतला.या सोहळ्यास स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.