पुणे :
देशाच्या संविधानाची माहिती सर्वांना व्हावी यासाठी केंद्र सरकार मार्फत हर घर संविधान हा उपक्रम राबवावा, याची सुरुवात या वर्षी पासून करावी अशी विनंती ज्येष्ठ पत्रकार तसेच कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी ई-मेल केले आहे.
त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, संविधान हा देशाचा आत्मा आहे. संविधानामुळे आपण आपापल्या क्षेमतेनुसार प्रगती करून देशाच्या विकासात सहभागी होऊ शकतो, संविधानामुळेच आपण एकसंघ आहोत. संविधानाबद्दलची माहीती देशातील सर्वांना व्हावी यासाठी आपण प्रतिवर्षी देशात संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय घेऊन २६ नोव्हेंबर २०१५ रोजी याची घोषणा केली.
२०२३ – २५ हे संविधानाचे ७५ वे वर्ष आहे. संविधान दिनाला २०२४ मध्ये ७५ वर्ष होतात आणि प्रजासत्ताक दिनाला २०२५ मध्ये ७५ वर्ष पूर्ण होतायेत. म्हणून दोन्ही दिवस एकत्र करून ‘संविधान का अमृत महोत्सव’ अथवा ‘घर घर संविधान’ हे अभियान आपण देशभर राबवावे. याची सुरुवात यावर्षी पासून करावी. संविधानाचे ७५ वे वर्ष देशभर सर्वत्र, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, शासकीय कार्यालये, न्यायालये, समाज ,कॉर्पोरेट क्षेत्र,माध्यमे यामध्ये साजरा केला जावा. याबाबत आपण सरकारमार्फत अध्यादेश काढावा अशी विंनती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.
More Stories
गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयात मानसशास्ञाचा ‘कॅलिडोस्कोप १६’ अंकाचे प्रकाशन
औंध येथील अमोल दत्तात्रय टेंबरे यांना भारत भूषण पुरस्कार प्रदान…
ग्राफिटीच्या हौशी कलाकारांचे चित्र प्रदर्शन संपन्न…