June 5, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पेरिविंकलच्या सुस शाखेला दगडू शेठ मंदिरात अथर्वशीर्ष पठणात प्रथम क्रमांक जाहीर!! 

पुणे :

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या ‘पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल च्या सूस’ शाखेला मागील वर्षी झालेल्या अथर्वशीर्ष पठाणा मध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले. यासाठी ऋषिपंचमी च्या दिवशी 33 हजार महिलांच्या समोर दगडूशेठ हलवाई ट्रस्ट कडून शाळेच्या मुख्याध्यापिका  यांना  पोलीस सह आयुक्त मा संदीप कर्णिक व दगडूशेठ चे ट्रस्टी श्री  हेमंत रासने ,श्री भालेराव व इतर मान्यवर यांच्या हस्ते शेला व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले व  यातच दुग्धशर्करा योग म्हणजे पेरीविंकलच्या विद्यार्थ्यांना सलग दुसऱ्या वर्षी दगडूशेठ मध्ये अथर्वशीर्ष पठणा चा योग जुळून आला .  इयत्ता 5वी ते 12 च्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना आज म्हणजे  गुरूवार दि.21/9/23 रोजी पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या सभामंडपाच्या गाभाऱ्यात अगदी पुढे बसून अथर्वशीर्ष आवर्तने व पठण करून महाआरतीचा दुग्धशर्करा योग लाभला.      

शिक्षणाबरोबरच आपल्या संस्कृतीचे जतन करण्याकडे पेरिविंकल चा कायमच  कल असतो. पेरिविंकल च्या सूस शाखेमधून सकाळी 4 वाजता 4 बसेसचे विद्यार्थ्यासाठी  शाळेने नियोजन केले होते. बसमधून सुमारे 320 विद्यार्थी व 25 शिक्षकवृंद हे दगडूशेठ येथील मंदिराच्या गाभाऱ्यात अथर्वशीर्ष आवर्तनाला अगदी उत्साहाने उपस्थित होते. 

पहाटे श्रींच्या आरतीचा लाभ घेऊन 5 ते 6 गणपती अथर्वशीर्ष आवर्तने करण्यात आली. श्रीमंत दगडूशेठ प्रतिष्ठान यांच्या कडून निमंत्रण पत्र शाळेला प्राप्त झाले होते. श्रीमंत दगडूशेठ  हलवाई मंडळाच्या वतीने शाळेच्या संचालिका सौ रेखा बांदल व मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सर्व शिक्षकवृंद यांचा देखील सन्मान करण्यात आला.   अशा प्रकारे गणेश उत्सवात दगडूशेठ येथे जाऊन गणपती अथर्वशीर्ष पठण करण्याचा एक आगळा वेगळा उपक्रम पेरिविंकलच्या सूस शाखेने राबवला. लाखो भक्तगणात दगडूशेठ येथे अथर्वशीर्ष आवर्तन करण्याचे निमंत्रण येणे हीच खूप भाग्याची बाब आहे.   

या संपूर्ण आगळ्या – वेगळ्या उपक्रमाचे आयोजन हे शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल व संचालिका सौ रेखा बांदल यांच्या अध्यक्षतेखाली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडीत यांच्या नियोजनेखाली सचिन खोडके सर व सर्व पर्यवेक्षक यांच्या सहकार्याने सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी यांच्या मदतीने करण्यात आले होते. शाळेतून मंदिर व मंदिरातून शाळा असा प्रवास व आवर्तनाचे नियोजन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते.