June 3, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सामाजिक स्विकार्यता महत्वाची : मा चांदनी गोरे, संस्थापक, निर्भया फाउंडेशन

गणेशखिंड :

गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयात ‘ मुक्तसंवाद’ या कार्यक्रमात बोलताना मा चांदनी गोरे, निर्भया फाउंडेशन संस्थापक म्हणाल्या, ” सामाजिक परिवर्तन होण्यासाठी युवा पिढिच्या मानसिकतेमधे बदल घडावा.त्यांच्याशी संवाद झाल्यास परिवर्तन हे होतेच. आईवडिल, शिक्षक यांच्याशी नेहमीच मोकळा संवाद होणे आवश्यक आहे. समाजातही Good touch Bad touch या विषयी जागृती करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तसेच महिला बचत गटामार्फत उद्योगधंदे चालवून त्यांना आर्थिकदृष्ठ्या सक्षम करण्यासाठी  आमची मदत होतआहे.”

मुक्तसंवाद साठी आर जे अपुर्वा, बिग एफ एम. म्युझिक मॅनेजर ही विद्यार्थ्यांच्या भेटीस आली होती. कुठल्याही क्षेत्रात पुढे जाण्यासाठी कष्ट करणे गरजेचे आहे. कुणाचीही नक्कल करु नका. स्वतःचे वेगळे अस्तित्व बनवा तरच यशस्वी व्हाल असे ती म्हणाली.

या दोघींचे सामाजसाठी मोठे काम आहे. Rj अपुर्वाने COVID पासून सुरु केलेला टिफिन व्यवसाय आजही चालु आहे. गरजवंताना आजही ही सेवा फुकट दिली जाते. अशा व्यक्ती विद्यार्थ्यांपुढे येणे गरजेचे आहे. भविष्यकाळात हेच यांचे काम पुढे नेतील व आदर्श समाज घडवतील असे उपप्राचार्य डाॅ ज्योती गगनग्रास म्हणाल्या.

कार्यक्रम समाजशास्र विभाग व पब्लिसिटी विभाग वाणिज्य शाखा यांच्या मार्फत हा कार्यक्रम घेण्यात आला. हा मुलाखतपर कार्यक्रम होता. डाॅ मंजुषा कुलकर्णी व प्रा पूजा यादव यांनी मुलाखत घेतली. डाॅ मेघा देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. डाॅ जयश्री खर्चे यांनी सुत्रसंचलन केले. श्रेया वाघमारे   व श्रावणी कुलकर्णी या विद्यार्थीनींनी मदत केली. डाॅ ज्योती गगनग्रास, उपप्राचार्य, कला शाखा यांनी मार्गदर्शन केले.

डॉ संजय खरात प्राचार्य, मॉडर्न कॉलेज, प्रा सुरेश तोडकर, सहकार्यवाह,पी ई सोसायटी व डॉ. प्रकाश दिक्षीत, उपकार्यवाह , पी. ई. सोसायटी यांनी अभिनंदन केले.