सुस :
सुस परिसरातील तिर्थ अविला सोसायटी ते जोशी वडेवाले या अत्यंत महत्त्वाच्या बाह्यवळण रस्त्याच्या कामाचा लोकार्पण सोहळा नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागात व आनंदी वातावरणात पार पडला. अवघ्या चार ते पाच दिवसांपूर्वी नागरिकांनी मांडलेली मागणी माजी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी तात्काळ पूर्ण केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
या नव्या बाह्यवळण रस्त्यामुळे तिर्थ अविला, किरण शुभंकरोती, किरण संकल्प, ऑक्सफर्ड पॅराडाईज, शांती टेरेस, रेलिकॉन एलन प्रशांत, तिर्थ आरोही आदी सोसायट्यांमधील रहिवाशांना दैनंदिन प्रवासात मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी या रस्त्याची अवस्था अतिशय खराब असून विशेषतः पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आज हा रस्ता सुरू होताच नागरिकांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंदच या कामाची खरी पावती असल्याचे मत माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांनी व्यक्त केले.
या बाह्यवळण रस्त्यामुळे सुस परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांच्या सुरक्षित व सुकर प्रवासासाठी हा मार्ग अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पायाभूत सुविधांमध्ये दर्जात्मकता राखून विकासकामे पूर्ण करणे व नागरिकांना सन्मानजनक जीवनमान उपलब्ध करून देणे हीच आपली आणि सहकाऱ्यांची प्रामाणिक भूमिका असल्याचे बाबूराव चांदेरे यांनी यावेळी सांगितले.
या लोकार्पण सोहळ्याला श्री राहुलदादा बालवडकर (उपाध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे शहर), श्री उत्तम ससार, सौ. रोहिणीताई चिमटे (मा. नगरसेविका – पुणे महानगरपालिका), सौ. अंजलीताई चांदेरे (मा. सरपंच – सुस), श्री समीर चांदेरे (अध्यक्ष – राष्ट्रवादी युवक काँग्रेस, पुणे शहर) यांच्यासह ग्रामस्थ व विविध सोसायट्यांमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
































More Stories
*‘विनायकी’ विनायक निम्हण शिष्यवृत्ती म्हणजे समाज घडवणारी योजना : पद्मविभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार*
लोकशाही संस्कारांचा अनोखा उपक्रम; विद्यापीठ हायस्कूलमध्ये शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात
कोथरूड विधानसभा मधील पाषाण-सुतारवाडी लिंक रोड वरील कचऱ्यावरून राजकारण पेटले! अमोल बालवडकरांच्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे; पण तत्परता फक्त ‘खास’ भागापुरतीच का?