बाणेर :
अष्टगंधा-मित्रनगर कॉलनीतील रहिवाशांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी गणेश कळमकर यांनी आज (शुक्रवार, २७ जुलै २०२५) स्थानिक सभासदांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कॉलनीसमोरील मुख्य समस्या समजून घेतल्या आणि त्यांच्या निराकरणासाठी पुढील नियोजनाबाबत मार्गदर्शन केले.
चर्चेदरम्यान रहिवाशांनी प्रामुख्याने पार्किंग समस्या, नाल्यांची स्वच्छता आणि दुर्गंधी तसेच वाहतूक कोंडी (ट्रॅफिक) या प्रमुख अडचणी कळमकर यांच्यासमोर मांडल्या.
या महत्त्वपूर्ण बैठकीला पुणे
महानगरपालिकेच्या (पीएमसी) ड्रेनेज विभागाचे अभियंता अनिकेत शिंदे उपस्थित होते. तसेच, गणेश कळमकर यांनी पीएमसीचे अधिकारी आडे सर यांच्याशी फोनवरून संवाद साधत, या समस्यांची गांभीर्याने दखल घेण्याची विनंती केली.
कळमकर यांनी रहिवाशांना आश्वासन दिले की, या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधला जाईल आणि योग्य उपाययोजना केल्या जातील.



More Stories
“उच्च तंत्र की तंत्रमंत्र? अमोल बालवडकरांचा भोंदू खरात सोबत फोटो वरून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा”
औंध ग्रामदैवत भैरवनाथ महाराज उत्सव ३ मे रोजी; ग्रामसभेत तारीख जाहीर
लहानग्यांच्या स्वप्नांना मिळाले पंख: पेरिविंकल पिरंगुटमध्ये सीनियर केजी ग्रॅज्युएशन डे जल्लोषात साजरा!!!