बालेवाडी :
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल दादा बालवडकर यांच्या वतीने माजी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाणेर आणि बालेवाडी परिसरातील सोसायट्यांमध्ये ‘आपुलकी संवाद अभियान’ राबविण्यात आले. या अभियानांतर्गत राहुल दादा बालवडकर यांनी विविध सोसायट्यांमधील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
या आपुलकीच्या भेटीदरम्यान, राहुल दादा यांनी नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच, या उपक्रमाचा एक भाग म्हणून, उपस्थित नागरिकांना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पावसाळी छत्र्या भेट देण्यात आल्या.
राहुल दादा बालवडकर हे नागरिकांच्या समस्या कमी करण्याच्या उद्देशाने सातत्याने विविध सोसायट्यांशी संपर्क साधून त्यांच्याशी संवाद साधत आहेत. या ‘आपुलकी संवाद अभियाना’मुळे नागरिकांना आपल्या समस्या थेट मांडण्याची संधी मिळाली असून, राहुल दादा यांच्या या प्रयत्नांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. भविष्यातही असे उपक्रम राबवून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे राहुल दादा बालवडकर यांनी नमूद केले.



More Stories
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप….
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सूस येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोपसमारंभ सोहळा संपन्न.
“शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कार घडले तरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते” – मा. आमदार शरद ढमाले