बालेवाडी :
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल दादा बालवडकर यांच्या वतीने माजी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाणेर आणि बालेवाडी परिसरातील सोसायट्यांमध्ये ‘आपुलकी संवाद अभियान’ राबविण्यात आले. या अभियानांतर्गत राहुल दादा बालवडकर यांनी विविध सोसायट्यांमधील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
या आपुलकीच्या भेटीदरम्यान, राहुल दादा यांनी नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच, या उपक्रमाचा एक भाग म्हणून, उपस्थित नागरिकांना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पावसाळी छत्र्या भेट देण्यात आल्या.
राहुल दादा बालवडकर हे नागरिकांच्या समस्या कमी करण्याच्या उद्देशाने सातत्याने विविध सोसायट्यांशी संपर्क साधून त्यांच्याशी संवाद साधत आहेत. या ‘आपुलकी संवाद अभियाना’मुळे नागरिकांना आपल्या समस्या थेट मांडण्याची संधी मिळाली असून, राहुल दादा यांच्या या प्रयत्नांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. भविष्यातही असे उपक्रम राबवून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे राहुल दादा बालवडकर यांनी नमूद केले.
More Stories
श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालख्यांवर हभप संजय बालवडकर यांच्याकडून हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, वारकऱ्यांचा जल्लोष!
प्रत्येक महिलेने योगाभ्यास करणे गरजेचे, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन
महाळुंगे येथील शितळा देवी नगर आणि मेट्रो जॅझ सोसायटीमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत; सौ पुनम विधाते यांच्या मदतकार्यामुळे नागरिकांना दिलासा…