February 4, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर-बालेवाडीत पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची करण्यात यावी, जीवन चाकणकर यांची मागणी..

औंध :

मागील काही वर्षांपासून बाणेर आणि बालेवाडी परिसरात पावसाळ्यात नाले आणि गटारे तुंबून मोठ्या प्रमाणात पाणी साचते. यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण होते आणि नागरिकांच्या जीविताला तसेच आरोग्याला धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर, यंदाच्या पावसाळ्यापूर्वीच या भागातील नाले आणि गटारांची तातडीने साफसफाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

बाणेर बालेवाडी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे शहर उपाध्यक्ष जीवन चाकणकर यांनी आज औंध क्षेत्रीय कार्यालयात जाऊन पुणे महानगरपालिकेचे मा. गिरीजी दापकेकर यांना याबाबत निवेदन सादर केले. निवेदनात चाकणकर यांनी मागील वर्षांमधील पाणी साचण्याच्या आणि पूर येण्याच्या घटनांचा उल्लेख करत यंदा संभाव्य धोका लक्षात घेण्याची विनंती केली. नालेसफाई वेळेत झाल्यास नागरिकांची गैरसोय टळेल आणि आरोग्याचे संरक्षण होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी मा. गिरीजी दापकेकर यांनी जीवन चाकणकर यांच्या मागणीची दखल घेतली आणि लवकरच नालेसफाईच्या कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि आरोग्याला प्राधान्य दिले जाईल आणि पावसाळ्यापूर्वी सर्व आवश्यक उपाययोजना पूर्ण केल्या जातील.

या महत्वपूर्ण भेटीदरम्यान माजी नगरसेवक प्रमोद अण्णा निम्हण आणि पवन खरात यांसारखे मान्यवर उपस्थित होते. त्यांनी देखील परिसरातील नागरिकांच्या समस्या मांडल्या आणि तातडीने कार्यवाही करण्याची गरज व्यक्त केली.

एकंदरीत, बाणेर-बालेवाडी परिसरातील संभाव्य पूरस्थिती आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी आतापासूनच प्रशासनाने पाऊले उचलणे गरजेचे आहे. जीवन चाकणकर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या या मागणीमुळे प्रशासनावर त्वरित कार्यवाही करेल अशी अपेक्षा आहे.