बालेवाडी :
बालेवाडी गाव येथील प्रमुख चौकातील अनेक दिवसांपासूनच्या खराब रस्त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुलदादा बालवडकर यांनी तातडीने हालचाल केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे या प्रमुख रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले असून, आजूबाजूच्या परिसरातील राडारोडा साफ करून सुशोभीकरण देखील करण्यात आले आहे.
गावातील प्रमुख चौक हा नेहमीच गावाची ओळख आणि शोभा वाढवणारा असतो. मात्र, बालेवाडी गावातील प्रमुख रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांना मोठी गैरसोय सहन करावी लागत होती. यासंदर्भात अनेक नागरिकांनी राहुलदादा बालवडकर यांच्याकडे तक्रार केली होती. नागरिकांच्या अडचणींची जाणीव होताच राहुलदादा बालवडकर यांनी त्वरित कार्यवाही करत रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेतले.
पुणे महानगरपालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या सहकार्याने हे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले. केवळ रस्त्याचे डांबरीकरणच नव्हे, तर परिसरातील अनावश्यक राडारोडा हटवून या भागाचे सुशोभीकरण देखील करण्यात आले आहे. यामुळे आता या चौकाला एक नवीन आणि आकर्षक रूप प्राप्त झाले आहे.



More Stories
“विद्युत विभागाची धडक कारवाई: बाणेर परिसरात २८०० मीटर अनधिकृत केबलवर कारवाई”
जागतिक कॅरम विजेती रश्मी कुमारी यांच्या हस्ते ‘नॅशनल पीएनजी ड्राईव्ह २.०’ अंतर्गत पीएनजी पुरवठ्याचा औंधमध्ये शुभारंभ
ना. चंद्रकांतदादा पाटील यांचा आणखी एक स्तुत्य पुढाकार ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’साठी ‘रिक्षामित्र फीडर’ सेवेचा शुभारंभ