बाणेर :
अखिल बालेवाडी एक गाव एक शिवजयंती उत्सव २०२५ निमित्ताने पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. रविवार, दि. १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ६.३० वाजता वसुंधरा अभियान, बाणेर यांच्या सहकार्याने बाणेर तुकाई टेकडीवर हा उपक्रम राबवण्यात आला.
या कार्यक्रमाला राहुलदादा बालवडकर यांनी उपस्थित राहून स्वतः वृक्षारोपण केले आणि उपस्थितांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी पर्यावरण रक्षणाचे महत्त्व सांगत भविष्यात अधिकाधिक वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले.
या उपक्रमात अनेक पर्यावरणप्रेमी, शिवभक्त आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपस्थितांनी वृक्षारोपण करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त निसर्ग संवर्धनाचा संकल्प केला.



More Stories
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप….
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सूस येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोपसमारंभ सोहळा संपन्न.
“शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कार घडले तरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते” – मा. आमदार शरद ढमाले