पिरंगुट :
सर्वच सण आणि उत्सव साजरा करण्याची पेरीविंकल मध्ये असेल्या दीर्घ परंपरेला साजेसा “बालदिनाचा” कार्यक्रम पेरीविंकलच्या पिरंगुट शाखेत विशेष उत्साहात साजरा करण्यात आला.
बालदिन हा केवळ खेळाच्या माध्यमातून साजरा न करता बालवयातील विद्यार्त्यांवर संस्कार होणे जास्त महत्वाचे. आणि हा मुद्दा डोळ्यासमोर ठेऊन पेरीविंकल शाळा समूहाच्या पिरंगुट शाखेत सर्व विद्यार्थ्यांना बालदिन, भारताचे थोर स्वातंत्र्यसेनानी व भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल मोतीलाल नेहरू यांच्या जन्म दिनाची माहिती सांगून वातावरण निर्मिती केली गेली. प्राथमिक विभागातील विद्यार्थ्याना पंडित नेहरू यांच्यावरील माहितीपटही दाखविण्यात आला.
स्वातंत्र्यचळवळीच्या काळात तुरुंगवास भोगत असताना त्यांनी त्यांची एकुलती एक लाडकी कन्या भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना लिहिलेल्या पत्रांतून बालशिक्षणाबाबत आपले विचार मांडले आहेत. मुले काय शिकतात यापेक्षा त्यांच्यावर कोणते संस्कार होतात, हे पालक व शिक्षक यांनी पाहिले पाहिजे. त्यांनी मुलांना ‘देवाघरची फुलेʼ मानली. ती बागेतल्या फुलांच्या कळीप्रमाणे असतात. त्यांना प्रेमाने व काळजीने हाताळली पाहिजेत; कारण बालकांमध्येच देशाचे भवितव्य दडलेले आहे; देशाची खरी शक्ती व समाजउभारणीचा पाया बालकेच असतात, असे ते म्हणत.
आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष मा. श्री. सचिनभाऊ अमराळे, ॲडव्होकेट राम धुमाळ सर, माजी आदर्श सरपंच मा. श्री. नामदेव अण्णा माझिरे यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल सर, संचालिका रेखा बांदल आणि शिवानी बांदल madam यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले. राजेंद्र बांदल सर, ॲडव्होकेट राम धुमाळ सर, तसेच मा. श्री. नामदेव अण्णा माझिरे यांनी आजच्या या विशेष प्रसंगी आपापले मौलिक विचार व्यक्त केले. शाखेचे मुख्याध्यापक डॉ. अभिजित टकले यांची संकल्पना मूर्त स्वरूपात आणण्यासाठी माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका पूनम पांढरे, प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका सना इनामदार तसेच पूर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका पल्लवी नारखेडे यांचेही विशेष सहकार्य लाभले. सर्व शिक्षक वृंद यांचे आजच्या या कार्यक्रमा साठी मोलाचे सहकार्य मिळाले.
पाण्यातील बोट, जंपिंग, नेमबाजी, इत्यादी अनेक खेळाचे प्रकार विद्यार्थ्यांसाठी नियोजित केले होते. त्याच बरोबर पाणीपुरी, रगडा पॅटीस , भेळ, वडापाव, नुडल्स असे एक ना अनेक खाद्य पदार्थ उपलब्ध होते. सोबत चहा, कॉफी आणि सरबताचीही रेलचेल दिमतीला होतीच. अशा तोंडाला पाणी आणणा–या पदार्थांच्या स्टॉल्सकडे केवळ विद्यार्थी नाही, तर पालकवर्गही आकृष्ट होत होता. विद्यार्थ्यांनी मनमुराद खेळून झाल्यावर आपाल्या पालकांसोबत अशा अनेक पदार्थांचा आस्वाद घेतला.
बालदिनाचा उत्साहवर्धक कार्यक्रम संपूच नये अशी भावना पेरीविंकलच्या बाल दोस्तांच्या चेह–यावर खेळती ठेउनच आजच्या या कार्यक्रमाची सांगता झाली.
More Stories
निसर्गछाया उपक्रम कोथरुड सह सर्वांसाठी खुला – ना. चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा ज्येष्ठ नागरिक नागरिक स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…
बाणेर-बालेवाडी परिसरातील नालेसफाईच्या समस्यांबाबत शिवम बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन..
बालेवाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भव्य बाईक रॅली आणि मिरवणूक उत्साहात संपन्न…