पुणे :
औंध, बाणेर, बालेवाडी व्यापारी संघटनेच्या वतीने श्री संत तुकाराम महाराज पालखी पंढरपूर कडे विठू माऊलीच्या भेटीला जात असताना पालखी सोहळ्यात असणाऱ्या सर्व दिंड्या आणि सोबत असणाऱ्या वारकऱ्यांना खाद्यपदार्थ (राजगिरा वडी शेंगदाणा लाडू उपासाचा चिवडा. त्याचबरोबर बिस्किटे) व 900 बॉक्स पाणी वाटप करण्यात आले.
व्यापारी संघटनेच्या वतीने दरवर्षी पालखी सोहळा दरम्यान वारकऱ्यांची सेवा केली जात असते. गेले पंधरा वर्षे हा उपक्रम राबविला जातो.
यावेळी व्यापारी संघटनेचे प्रकाश तापकीर, भवरलाल चौधरी, पन्ना राम काग, वरदाराम भायल, जेठाराम गेलोत, दलपत सोयल यांनी उपस्थित राहून वारकऱ्यांची सेवा केली.
More Stories
बाणेर-बालेवाडी परिसरातील नालेसफाईच्या समस्यांबाबत शिवम बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन..
बालेवाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भव्य बाईक रॅली आणि मिरवणूक उत्साहात संपन्न…
सूस शाखेच्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये पुस्तकी अभ्यासाच्या व्यतिरिक्त देखील अनोखे मार्गदर्शन