बाणेर :
नुकत्याच रंग पंचमी च्या दिवशी पार पडलेल्या “फुलों कि होळी” चा कार्यक्रम बाणेर येथील हनुमान मंदिरात साजरा झाला. या प्रसंगी जवळपास तीनशे लोकांची उपस्थिती होती. सर्वाना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी मधुसूदन मारू, बियाणी, सीए श्वेतांग मुरक्या, चंद्रकांत जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला बन्सी अण्णा मुरकुटे यांनी हनुमान मंदिर बाणेर येथे यासाठी जागा उपलब्ध करून दिली.
नंदकिशोर काबरा, मुरलीधर जाजू, बनवारीदत्त जोशी या जेष्ठ नागरिकांनी १४ वर्षांपूर्वी ‘सुंदर कांड परिवार, बाणेर-बालेवाडी’ ची स्थापना केली होती. त्यांच्या मार्फत विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. आशिष भार्गव, उत्पल, राजू इसरानी, रामकुमार मौर्य, अभिषेक भार्गव यांच्या सहकार्याने दर शनिवारी येथे सुंदर कांड पाठ होतो.


More Stories
*बावधन च्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सोनक टोयोटाच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण जनजागृती व वृक्षारोपण अभियान उत्साहात संपन्न!!!*
*ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरा*
“वीज सडक पाणी” प्रश्न, बालेवाडी वेलफेअर फेडरेशनने मांडला महाराष्ट्राच्या मंत्रालयात.