बाणेर :
नुकत्याच रंग पंचमी च्या दिवशी पार पडलेल्या “फुलों कि होळी” चा कार्यक्रम बाणेर येथील हनुमान मंदिरात साजरा झाला. या प्रसंगी जवळपास तीनशे लोकांची उपस्थिती होती. सर्वाना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी मधुसूदन मारू, बियाणी, सीए श्वेतांग मुरक्या, चंद्रकांत जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला बन्सी अण्णा मुरकुटे यांनी हनुमान मंदिर बाणेर येथे यासाठी जागा उपलब्ध करून दिली.
नंदकिशोर काबरा, मुरलीधर जाजू, बनवारीदत्त जोशी या जेष्ठ नागरिकांनी १४ वर्षांपूर्वी ‘सुंदर कांड परिवार, बाणेर-बालेवाडी’ ची स्थापना केली होती. त्यांच्या मार्फत विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. आशिष भार्गव, उत्पल, राजू इसरानी, रामकुमार मौर्य, अभिषेक भार्गव यांच्या सहकार्याने दर शनिवारी येथे सुंदर कांड पाठ होतो.
More Stories
मुळशीचे चित्र बदलण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार – ना. चंद्रकांतदादा पाटील मुठा खोऱ्यातील मुलींच्या शिक्षणासाठी बसचे लोकार्पण
सदाशिव पेठेतील दुर्घटनेतील जखमींची ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून विचारपूस
बालेवाडी येथील संस्कृती होम्समधील गार्डला मारहाण प्रकरण: बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनचे पोलिसांना निवेदन