बालेवाडी :
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधील बालेवाडी परिसरात उमेदवार जीवन चाकणकर यांनी गल्लोगल्ली फिरत नागरिकांशी थेट संवाद साधला. या भेटीदरम्यान प्रचारापेक्षा अधिक आपुलकीची नाती जुळली आणि भाषणांपेक्षा अधिक माणसं भेटल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
बालेवाडीतील नागरिकांशी संवाद साधताना चाकणकर म्हणाले की, ही केवळ निवडणूक लढाई नसून आपल्या गावाच्या आणि परिसराच्या उज्ज्वल भविष्यासाठी घेतलेली जबाबदारी आहे. मोठी आश्वासने देणे सोपे असते, मात्र नागरिकांच्या डोळ्यात डोळे घालून प्रामाणिकपणे उभे राहणे हीच खरी कसोटी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या जनसंवादातून पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, वाहतूक तसेच मूलभूत नागरी सुविधांबाबत नागरिकांनी आपल्या अपेक्षा आणि समस्या मांडल्या. प्रत्येक प्रश्न गांभीर्याने ऐकून तो सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, असा विश्वास चाकणकर यांनी दिला.
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात नागरिकांचा विश्वास आणि साथ महत्त्वाची असल्याचे सांगत, “हा प्रवास तुमच्यासाठी आणि तुमच्यासोबतच आहे,” असे आवाहन जीवन चाकणकर यांनी केले. नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत सकारात्मक वातावरण निर्माण केल्याचे चित्र बालेवाडी परिसरात पाहायला मिळाले.



More Stories
“उच्च तंत्र की तंत्रमंत्र? अमोल बालवडकरांचा भोंदू खरात सोबत फोटो वरून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा”
औंध ग्रामदैवत भैरवनाथ महाराज उत्सव ३ मे रोजी; ग्रामसभेत तारीख जाहीर
लहानग्यांच्या स्वप्नांना मिळाले पंख: पेरिविंकल पिरंगुटमध्ये सीनियर केजी ग्रॅज्युएशन डे जल्लोषात साजरा!!!