बाणेर :
बाणेर–बालेवाडी परिसर हा पुण्यातील एक महत्त्वाचा आयटी हब म्हणून ओळखला जातो. या परिसरात देश-विदेशातील नामांकित आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे असंख्य सुशिक्षित, तरुण आणि प्रगतीशील नागरिक वास्तव्यास आहेत. बदलत्या काळानुसार प्रभागाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर प्रशासन आणि स्थानिक राजकारणातही तितकाच दूरदृष्टी असलेला, आधुनिक विचारांचा आणि शिकलेला नेतृत्व आवश्यक असल्याचे मत आयटी समुदायाकडून व्यक्त होत आहे.
याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांनी जयेश मुरकुटे यांच्या आगामी स्थानिक राजकारणातील सक्रिय भूमिकेकडे आशेने पाहण्यास सुरुवात केली आहे. पारदर्शक कारभार, शाश्वत विकास आणि नागरिक-केंद्रित निर्णयप्रक्रिया ही त्यांची दृष्टी प्रभागाच्या भविष्यासाठी महत्त्वाची ठरू शकते, असे मत अनेक आयटी व्यावसायिक व्यक्त करत आहेत.
“आयटीला हवा शिकलेला माणूस” अशी भावना व्यक्त करत नागरिक सांगतात की, स्मार्ट सिटीच्या धर्तीवर पायाभूत सुविधा, वाहतूक, पर्यावरण, डिजिटल सेवा आणि नियोजनबद्ध विकासासाठी जयेश मुरकुटे यांसारख्या सुशिक्षित व्यक्तीचे नेतृत्व प्रभागासाठी फायदेशीर ठरेल.
बाणेर–बालेवाडी परिसराचा झपाट्याने होत असलेला विस्तार लक्षात घेता, केवळ राजकीय अनुभव नव्हे तर आधुनिक तंत्रज्ञानाची जाण, प्रशासनाची समज आणि नागरिकांशी संवाद साधण्याची क्षमता असलेले नेतृत्व काळाची गरज असल्याचे आयटी समुदायाचे ठाम मत आहे.



More Stories
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीचा मेणबत्ती मोर्चा
गायनातून भाव व्यक्त होणे अत्यावश्यक : पं. उपेंद्र भट सोमेश्वर फाउंडेशनतर्फे २४ व्या ‘पुणे आयडॉल- 2026’ स्पर्धेचे उद्घाटन