बाणेर :
बाणेर–बालेवाडी परिसर हा पुण्यातील एक महत्त्वाचा आयटी हब म्हणून ओळखला जातो. या परिसरात देश-विदेशातील नामांकित आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे असंख्य सुशिक्षित, तरुण आणि प्रगतीशील नागरिक वास्तव्यास आहेत. बदलत्या काळानुसार प्रभागाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर प्रशासन आणि स्थानिक राजकारणातही तितकाच दूरदृष्टी असलेला, आधुनिक विचारांचा आणि शिकलेला नेतृत्व आवश्यक असल्याचे मत आयटी समुदायाकडून व्यक्त होत आहे.
याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांनी जयेश मुरकुटे यांच्या आगामी स्थानिक राजकारणातील सक्रिय भूमिकेकडे आशेने पाहण्यास सुरुवात केली आहे. पारदर्शक कारभार, शाश्वत विकास आणि नागरिक-केंद्रित निर्णयप्रक्रिया ही त्यांची दृष्टी प्रभागाच्या भविष्यासाठी महत्त्वाची ठरू शकते, असे मत अनेक आयटी व्यावसायिक व्यक्त करत आहेत.
“आयटीला हवा शिकलेला माणूस” अशी भावना व्यक्त करत नागरिक सांगतात की, स्मार्ट सिटीच्या धर्तीवर पायाभूत सुविधा, वाहतूक, पर्यावरण, डिजिटल सेवा आणि नियोजनबद्ध विकासासाठी जयेश मुरकुटे यांसारख्या सुशिक्षित व्यक्तीचे नेतृत्व प्रभागासाठी फायदेशीर ठरेल.
बाणेर–बालेवाडी परिसराचा झपाट्याने होत असलेला विस्तार लक्षात घेता, केवळ राजकीय अनुभव नव्हे तर आधुनिक तंत्रज्ञानाची जाण, प्रशासनाची समज आणि नागरिकांशी संवाद साधण्याची क्षमता असलेले नेतृत्व काळाची गरज असल्याचे आयटी समुदायाचे ठाम मत आहे.





























More Stories
सुस परिसर वाहतूक कोंडीबाबत अनिकेत चांदेरे यांच्याकडून वाहतूक पोलिसांना निवेदन
मैत्रीचा धागा, विश्वासाचे नाते! युवा स्पंदनतर्फे चतुःश्रुंगी व कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये फ्रेंडशिप डे उपक्रम
*”‘मोठी स्वप्ने पाहा… भारत घडवा!’ — भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणादायी विचारांचा वारसा बावधन येथील पेरीविंकल च्या विद्यार्थ्यांपर्यंत !!!!*