बालेवाडी :
वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर गरजू व निराधार नागरिकांना दिलासा मिळावा, या उद्देशाने राजाभाऊ गुडदे फाउंडेशनच्या वतीने “मायेची ऊब” या नावाने ब्लँकेट वाटप अभियान यशस्वीरीत्या राबविण्यात आले. हे अभियान दिनांक २० डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत विविध भागांमध्ये पार पडले.
या सामाजिक उपक्रमांतर्गत फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी शहर व परिसरातील विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देत सुमारे ६० ब्लँकेट्स गरजू नागरिकांना वितरित केली. रस्त्यावर राहणारे नागरिक, वृद्ध व्यक्ती, मजूर तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना या उपक्रमाचा विशेष लाभ झाला.
ब्लँकेट वाटप करताना फाउंडेशनच्या सदस्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व माणुसकीच्या नात्याने मदतीचा हात पुढे केला. या उपक्रमामुळे थंडीच्या दिवसांत अनेकांना उब व मानसिक आधार मिळाला.
राजाभाऊ गुडदे फाउंडेशनतर्फे भविष्यातही अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम सातत्याने राबवून समाजातील वंचित व गरजू घटकांसाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.



More Stories
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीचा मेणबत्ती मोर्चा
गायनातून भाव व्यक्त होणे अत्यावश्यक : पं. उपेंद्र भट सोमेश्वर फाउंडेशनतर्फे २४ व्या ‘पुणे आयडॉल- 2026’ स्पर्धेचे उद्घाटन