बालेवाडी :
वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर गरजू व निराधार नागरिकांना दिलासा मिळावा, या उद्देशाने राजाभाऊ गुडदे फाउंडेशनच्या वतीने “मायेची ऊब” या नावाने ब्लँकेट वाटप अभियान यशस्वीरीत्या राबविण्यात आले. हे अभियान दिनांक २० डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत विविध भागांमध्ये पार पडले.
या सामाजिक उपक्रमांतर्गत फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी शहर व परिसरातील विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देत सुमारे ६० ब्लँकेट्स गरजू नागरिकांना वितरित केली. रस्त्यावर राहणारे नागरिक, वृद्ध व्यक्ती, मजूर तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना या उपक्रमाचा विशेष लाभ झाला.
ब्लँकेट वाटप करताना फाउंडेशनच्या सदस्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व माणुसकीच्या नात्याने मदतीचा हात पुढे केला. या उपक्रमामुळे थंडीच्या दिवसांत अनेकांना उब व मानसिक आधार मिळाला.
राजाभाऊ गुडदे फाउंडेशनतर्फे भविष्यातही अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम सातत्याने राबवून समाजातील वंचित व गरजू घटकांसाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.



More Stories
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप….
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सूस येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोपसमारंभ सोहळा संपन्न.
“शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कार घडले तरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते” – मा. आमदार शरद ढमाले