बाणेर :
भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडळाचे सरचिटणीस सचिन दळवी व नेत्या लक्ष्मी सचिन दळवी यांनी बाणेर परिसरात ‘संवाद आपुलकीचा’ अभियानांतर्गत नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या विविध समस्या, अपेक्षा आणि विकासाविषयीचे मुद्दे जाणून घेतले.
नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून त्यावर उपाययोजना करण्यासंबंधीची चर्चा यावेळी उत्साहपूर्ण पद्धतीने पार पडली. वाहतूक कोंडी, रस्त्यांची देखभाल, पिण्याच्या पाण्याचे नियोजन, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक सोयीसुविधा आदी महत्त्वाच्या नागरी प्रश्नांबाबत नागरिकांनी मोकळेपणाने मत मांडले.
या संवादादरम्यान सचिन दळवी यांनी नागरिकांना खात्री दिली की, विकासात्मक दृष्टिकोन ठेवून या समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी ठोस पुढाकार घेतला जाईल. तसेच विविध शासकीय कार्यालयांशी समन्वय साधत प्रशासकीय पातळीवर आवश्यक ती पावले उचलली जातील, असे त्यांनी यावेळी सांगितले.
लक्ष्मी सचिन दळवी यांनीही परिसरातील महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत सामाजिक सहभाग वाढविण्यावर भर दिला. त्या म्हणाल्या की, बदलाची प्रक्रिया लोकसहभागातूनच वेगाने पुढे जाते आणि नागरिकांनी या उपक्रमात सक्रियपणे सहभागी व्हावे.
नागरिक-विकास संवादाच्या माध्यमातून आयोजित हा कार्यक्रम यशस्वी ठरला असून पुढील काही दिवसांमध्ये परिसरातील इतर भागांमध्येही अशा भेटी घेण्यात येणार आहेत. बाणेर परिसराच्या विकासासाठी हा संवाद महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.



More Stories
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप….
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सूस येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोपसमारंभ सोहळा संपन्न.
“शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कार घडले तरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते” – मा. आमदार शरद ढमाले