बाणेर :
बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी परिसरात वाढत्या लोकसंख्येमुळे आणि वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत होती. नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारावर याचा मोठा परिणाम होत होता.
ही अडचण ओळखून अमोल बालवडकर फाउंडेशनतर्फे प्रभागातील प्रमुख चौकांवर, गर्दीच्या ठिकाणी आणि वर्दळीच्या मार्गांवर प्रशिक्षित ट्रॅफिक वॉर्डन्सची नियुक्ती करण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे वाहतुकीत शिस्त निर्माण होत असून वाहनांचा प्रवास अधिक सुरळीत व सुरक्षित बनला आहे. परिणामी नागरिकांचा मौल्यवान वेळ वाचत असून शाळकरी विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालकांना मोठा दिलासा मिळत आहे.
सुव्यवस्थित, सुरक्षित आणि सुसंस्कारित शहर घडवण्याच्या उद्देशाने ही सेवा सातत्याने आणि प्रभावीपणे सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थेमार्फत देण्यात आली आहे.
या सामाजिक उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत होत असून वाहतूक व्यवस्थापनात नव्या पद्धतीचा सकारात्मक बदल घडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.


More Stories
“उच्च तंत्र की तंत्रमंत्र? अमोल बालवडकरांचा भोंदू खरात सोबत फोटो वरून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा”
औंध ग्रामदैवत भैरवनाथ महाराज उत्सव ३ मे रोजी; ग्रामसभेत तारीख जाहीर
लहानग्यांच्या स्वप्नांना मिळाले पंख: पेरिविंकल पिरंगुटमध्ये सीनियर केजी ग्रॅज्युएशन डे जल्लोषात साजरा!!!