बालेवाडी :
मराठवाडा परिसरातील पुरग्रस्त भाग (जिल्हा:धाराशीव) भूम परांडा तालुक्यात वंसुधरा अभियान यांच्या मदतीने धान्य किट देण्यात आले. या किटमध्ये तांदूळ, डाळ, तेल, मसाले, साखर, चहापती, बिस्किटे इत्यादी रोजच्या गरजेच्या वस्तूंचा समावेश होता.
या उपक्रमासाठी स्वप्नील धसाळ, सारंग चव्हाण, अक्षय मालुसरे, जयश्री दाते, मनोज माने, मनोज जोशी, संगीत गुडदे,धनंजय गवारे, स्वप्नील जैन, मुकेश शहाकर, अनिमेष गुडदे, शैलेश अपोतीकर, रामचंद्रन वेणुगोपाल यांचे सहकार्य लाभले.
या उपक्रमाद्वारे पूरग्रस्त कुटुंबांना थोडा दिलासा मिळावा आणि त्यांच्या अडचणींमध्ये मदतीचा हात मिळावा, हा राजाभाऊ गुडदे फाउंडेशनचा उद्देश असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा किरण संगीत गुडदे यांनी सांगितले.



More Stories
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीचा मेणबत्ती मोर्चा
गायनातून भाव व्यक्त होणे अत्यावश्यक : पं. उपेंद्र भट सोमेश्वर फाउंडेशनतर्फे २४ व्या ‘पुणे आयडॉल- 2026’ स्पर्धेचे उद्घाटन