बालेवाडी :
मराठवाडा परिसरातील पुरग्रस्त भाग (जिल्हा:धाराशीव) भूम परांडा तालुक्यात वंसुधरा अभियान यांच्या मदतीने धान्य किट देण्यात आले. या किटमध्ये तांदूळ, डाळ, तेल, मसाले, साखर, चहापती, बिस्किटे इत्यादी रोजच्या गरजेच्या वस्तूंचा समावेश होता.
या उपक्रमासाठी स्वप्नील धसाळ, सारंग चव्हाण, अक्षय मालुसरे, जयश्री दाते, मनोज माने, मनोज जोशी, संगीत गुडदे,धनंजय गवारे, स्वप्नील जैन, मुकेश शहाकर, अनिमेष गुडदे, शैलेश अपोतीकर, रामचंद्रन वेणुगोपाल यांचे सहकार्य लाभले.
या उपक्रमाद्वारे पूरग्रस्त कुटुंबांना थोडा दिलासा मिळावा आणि त्यांच्या अडचणींमध्ये मदतीचा हात मिळावा, हा राजाभाऊ गुडदे फाउंडेशनचा उद्देश असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा किरण संगीत गुडदे यांनी सांगितले.



More Stories
“उच्च तंत्र की तंत्रमंत्र? अमोल बालवडकरांचा भोंदू खरात सोबत फोटो वरून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा”
औंध ग्रामदैवत भैरवनाथ महाराज उत्सव ३ मे रोजी; ग्रामसभेत तारीख जाहीर
लहानग्यांच्या स्वप्नांना मिळाले पंख: पेरिविंकल पिरंगुटमध्ये सीनियर केजी ग्रॅज्युएशन डे जल्लोषात साजरा!!!