बाणेर :
मराठा आरक्षणासह नऊ मागण्यांसाठी येत्या २९ ऑगस्टपासून मुंबईत मराठा समाजाचे आंदोलन सुरू होत आहे. या आंदोलनासाठी २७ ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील अंतरवली येथून मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत. या पार्श्वभूमीवर बाणेर येथील कुंदन गार्डन येथे बाणेर, बालेवाडी, औंध, सुस, महाळुंगे, पाषाण, सुतारवाडी व सोमेश्वरवाडी भागातील मराठा समाजाची नियोजन बैठक पार पडली.
बैठकीत आंदोलनासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था, प्रवासाची सोय आणि अन्य महत्वाच्या तयारीवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी आंदोलनासाठी आवश्यक असलेली रसद पुण्यातून पुरवली जाणार असल्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
मराठा समाजाच्या मागण्यांसाठी होणाऱ्या या ऐतिहासिक आंदोलनात पुण्यातून मोठ्या प्रमाणावर सहभाग होणार असल्याचे या बैठकीत ठळकपणे अधोरेखित करण्यात आले.




























More Stories
कोथरूड विधानसभा मधील पाषाण-सुतारवाडी लिंक रोड वरील कचऱ्यावरून राजकारण पेटले! अमोल बालवडकरांच्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे; पण तत्परता फक्त ‘खास’ भागापुरतीच का?
सुस परिसर वाहतूक कोंडीबाबत अनिकेत चांदेरे यांच्याकडून वाहतूक पोलिसांना निवेदन
मैत्रीचा धागा, विश्वासाचे नाते! युवा स्पंदनतर्फे चतुःश्रुंगी व कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये फ्रेंडशिप डे उपक्रम