बाणेर :
मराठा आरक्षणासह नऊ मागण्यांसाठी येत्या २९ ऑगस्टपासून मुंबईत मराठा समाजाचे आंदोलन सुरू होत आहे. या आंदोलनासाठी २७ ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील अंतरवली येथून मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत. या पार्श्वभूमीवर बाणेर येथील कुंदन गार्डन येथे बाणेर, बालेवाडी, औंध, सुस, महाळुंगे, पाषाण, सुतारवाडी व सोमेश्वरवाडी भागातील मराठा समाजाची नियोजन बैठक पार पडली.
बैठकीत आंदोलनासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था, प्रवासाची सोय आणि अन्य महत्वाच्या तयारीवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी आंदोलनासाठी आवश्यक असलेली रसद पुण्यातून पुरवली जाणार असल्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
मराठा समाजाच्या मागण्यांसाठी होणाऱ्या या ऐतिहासिक आंदोलनात पुण्यातून मोठ्या प्रमाणावर सहभाग होणार असल्याचे या बैठकीत ठळकपणे अधोरेखित करण्यात आले.


More Stories
“उच्च तंत्र की तंत्रमंत्र? अमोल बालवडकरांचा भोंदू खरात सोबत फोटो वरून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा”
औंध ग्रामदैवत भैरवनाथ महाराज उत्सव ३ मे रोजी; ग्रामसभेत तारीख जाहीर
लहानग्यांच्या स्वप्नांना मिळाले पंख: पेरिविंकल पिरंगुटमध्ये सीनियर केजी ग्रॅज्युएशन डे जल्लोषात साजरा!!!