बालेवाडी :
बालेवाडी येथे भूमाता कृषी मंचच्या वतीने वाईट प्रवृत्तींची होळी करण्यात आली. या होळीत वाल्मीक कराड, प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्या प्रतिमांचे दहन करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल बालवडकर, हरिभक्त परायण संजय बापू वालवडकर, राष्ट्रपती पुरस्कार विजेते श्री रवी घाटे, राजेश चव्हाण, संदीप बालवडकर, मारुती रानवडे आणि श्री शिवराज मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या होळीचे आयोजन समाजात पसरलेल्या वाईट प्रवृत्तींना विरोध करण्यासाठी केले गेले होते. या होळीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.



More Stories
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीचा मेणबत्ती मोर्चा
गायनातून भाव व्यक्त होणे अत्यावश्यक : पं. उपेंद्र भट सोमेश्वर फाउंडेशनतर्फे २४ व्या ‘पुणे आयडॉल- 2026’ स्पर्धेचे उद्घाटन