बालेवाडी :
भूमाता कृषी मंचच्या वतीने बालेवाडी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विमान अपघात प्रकरणातील VSR कंपनीच्या विमानाचे प्रतीकात्मक दहन करण्यात आले. यावेळी संबंधित कंपनीचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला.
होलिका मातेसमोर दुर्गुणांचा तसेच वाईट विचारांचा विनाश व्हावा, अशी प्रार्थना करण्यात आली. या अपघात प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भूमाता संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल बालवडकर यांनी केली. तसेच तपासात होत असलेल्या विलंबाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
या वेळी गोसेवक संजय बापू बालवडकर, श्री शिवराज मित्र मंडळाचे अध्यक्ष अशोक बालवडकर, संदीप बालवडकर, प्रगतशील शेतकरी राजेश चव्हाण, चंद्रशेखर बालवडकर, जालिंदर भंडारी, राजू कविटकर, शिवराज मित्र मंडळाचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



More Stories
सोमेश्वर फाऊंडेशन व मनोदय व्यसनमुक्ती संस्थेचे लमाणतांडा येथे नवे केंद्र सुरू – वस्तीपातळीवर व्यसनमुक्तीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल
“बुद्धिमत्तेसोबत कठोर परिश्रमही यशासाठी तितकेच आवश्यक” : सनी निम्हण खडकीच्या सृष्टी मित्तलने सीबीएससी बोर्डात 96.6% गुण मिळवत यश संपादन केल्याबद्दल केला सन्मान
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, पिरंगुट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी…