बालेवाडी :
भूमाता कृषी मंचच्या वतीने बालेवाडी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विमान अपघात प्रकरणातील VSR कंपनीच्या विमानाचे प्रतीकात्मक दहन करण्यात आले. यावेळी संबंधित कंपनीचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला.
होलिका मातेसमोर दुर्गुणांचा तसेच वाईट विचारांचा विनाश व्हावा, अशी प्रार्थना करण्यात आली. या अपघात प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भूमाता संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल बालवडकर यांनी केली. तसेच तपासात होत असलेल्या विलंबाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
या वेळी गोसेवक संजय बापू बालवडकर, श्री शिवराज मित्र मंडळाचे अध्यक्ष अशोक बालवडकर, संदीप बालवडकर, प्रगतशील शेतकरी राजेश चव्हाण, चंद्रशेखर बालवडकर, जालिंदर भंडारी, राजू कविटकर, शिवराज मित्र मंडळाचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



More Stories
सुपर सनी मंथ” क्रीडा महोत्सवाअंतर्गत सोमेश्वर चषक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा; सिद्धांत गायकवाड, रियान मोहम्मद, संकलेचा जिनम, गोरांक्ष खंडेलवाल, विहान कांबळे संयुक्त आघाडीवर
बालेवाडी-वाकड मिसिंग लिंकची उच्च न्यायालयाकडून दखल, जमीन संपादित करुन काम जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश, ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश..
बावधन शाखेच्या पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पूर्व-प्राथमिक विभागातील चिमुकल्यांनी भरवली विज्ञान शाळा!