बाणेर :
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार श्री. गणेश कळमकर यांनी बाणेर येथील व्हेंटेज सोसायटीतील रहिवाशांशी थेट भेटीगाठी घेत जनसंवाद साधला. या भेटीदरम्यान त्यांनी नागरिकांशी संवाद साधत परिसरातील विकास, मूलभूत सुविधा तसेच सुरक्षिततेविषयीच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या.
नागरिकांनी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत विविध मुद्दे मांडले. या सर्व प्रश्नांवर ठोस, कालबद्ध आणि प्रभावी उपाययोजना राबवण्याचा निर्धार श्री. कळमकर यांनी व्यक्त केला.
“प्रत्येक घराशी थेट संवाद आणि प्रत्येक नागरिकाच्या मनात निर्माण होणारा विश्वास हीच खरी ताकद आहे,” असे सांगत त्यांनी लोकसहभागातून विकास साधण्याचा विश्वास व्यक्त केला. या भेटीगाठींमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून आगामी निवडणुकीसाठी जनसमर्थन अधिक बळकट होत असल्याचे चित्र दिसून आले.



More Stories
“उच्च तंत्र की तंत्रमंत्र? अमोल बालवडकरांचा भोंदू खरात सोबत फोटो वरून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा”
औंध ग्रामदैवत भैरवनाथ महाराज उत्सव ३ मे रोजी; ग्रामसभेत तारीख जाहीर
लहानग्यांच्या स्वप्नांना मिळाले पंख: पेरिविंकल पिरंगुटमध्ये सीनियर केजी ग्रॅज्युएशन डे जल्लोषात साजरा!!!