बाणेर :
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार गायत्री मेढे कोकाटे, बाबुराव चांदेरे, पार्वती निम्हण आणि अमोल बालवडकर यांनी प्रचाराच्या शिगेला पोहोचलेल्या काळात एक कौतुकास्पद व जनहिताचा निर्णय घेतला आहे.
प्रचारासाठी कोणतीही बाईक रॅली किंवा वाहन रॅली न काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना होणारा त्रास टाळण्यावर उमेदवारांनी स्पष्ट भर दिला आहे. “आम्ही विकासाच्या कामावर मत मागत आहोत, लोकांच्या दैनंदिन जीवनात अडथळा निर्माण करून नाही,” अशी ठाम भूमिका उमेदवारांनी मांडली आहे.
प्रभागातील नागरिकांकडून उमेदवारांना प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, नागरिकांचा विश्वास हेच आपले खरे भांडवल असल्याचे उमेदवारांनी नमूद केले. नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठीच आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत, आणि कोणत्याही परिस्थितीत जनतेला त्रास होईल असे प्रकार आम्ही करणार नाही, असा विश्वासही त्यांनी दिला.
“जनहित हेच आमचे ब्रीद” या तत्वावर काम करत, विकासाभिमुख, संवेदनशील आणि जबाबदार राजकारणाचा आदर्श प्रभाग ९ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी घालून दिला आहे.


More Stories
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीचा मेणबत्ती मोर्चा
गायनातून भाव व्यक्त होणे अत्यावश्यक : पं. उपेंद्र भट सोमेश्वर फाउंडेशनतर्फे २४ व्या ‘पुणे आयडॉल- 2026’ स्पर्धेचे उद्घाटन