बाणेर :
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार गायत्री मेढे कोकाटे, बाबुराव चांदेरे, पार्वती निम्हण आणि अमोल बालवडकर यांनी प्रचाराच्या शिगेला पोहोचलेल्या काळात एक कौतुकास्पद व जनहिताचा निर्णय घेतला आहे.
प्रचारासाठी कोणतीही बाईक रॅली किंवा वाहन रॅली न काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना होणारा त्रास टाळण्यावर उमेदवारांनी स्पष्ट भर दिला आहे. “आम्ही विकासाच्या कामावर मत मागत आहोत, लोकांच्या दैनंदिन जीवनात अडथळा निर्माण करून नाही,” अशी ठाम भूमिका उमेदवारांनी मांडली आहे.
प्रभागातील नागरिकांकडून उमेदवारांना प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, नागरिकांचा विश्वास हेच आपले खरे भांडवल असल्याचे उमेदवारांनी नमूद केले. नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठीच आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत, आणि कोणत्याही परिस्थितीत जनतेला त्रास होईल असे प्रकार आम्ही करणार नाही, असा विश्वासही त्यांनी दिला.
“जनहित हेच आमचे ब्रीद” या तत्वावर काम करत, विकासाभिमुख, संवेदनशील आणि जबाबदार राजकारणाचा आदर्श प्रभाग ९ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी घालून दिला आहे.


More Stories
“उच्च तंत्र की तंत्रमंत्र? अमोल बालवडकरांचा भोंदू खरात सोबत फोटो वरून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा”
औंध ग्रामदैवत भैरवनाथ महाराज उत्सव ३ मे रोजी; ग्रामसभेत तारीख जाहीर
लहानग्यांच्या स्वप्नांना मिळाले पंख: पेरिविंकल पिरंगुटमध्ये सीनियर केजी ग्रॅज्युएशन डे जल्लोषात साजरा!!!