बालेवाडी :
प्रभाग क्रमांक ९ मधील बालेवाडी परिसरात परिवर्तनाची हाक देत काल एका उमेदवाराच्या प्रचारार्थ भव्य आणि उत्स्फूर्त पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेला स्थानिक रहिवाशी, सहकारी मित्र, कार्यकर्ते आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
“आता वेळ परिवर्तन घडवण्याची” या संदेशासह काढण्यात आलेल्या पदयात्रेमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आगामी निवडणुकीत बदलाची भूमिका स्पष्ट केली. बालेवाडीतील नागरिकांमध्ये प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी विकासाभिमुख, तरुण आणि सुशिक्षित लोकप्रतिनिधीची गरज असल्याचा ठाम मतप्रवाह यावेळी दिसून आला.
पदयात्रेदरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. स्थानिक प्रश्न, विकासाच्या अपेक्षा तसेच भविष्यातील नियोजन यावर सकारात्मक चर्चा झाली. नागरिकांनी उमेदवाराला भरभरून पाठिंबा देत परिवर्तनाच्या या लढाईत कायम साथ देण्याचा विश्वास व्यक्त केला.
नागरिकांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने प्रभाग क्रमांक ९ मध्ये विकासासाठी निश्चितच परिवर्तन घडवून आणले जाईल, असा विश्वास यावेळी उमेदवारांनी व्यक्त केला.





























More Stories
कोथरूड विधानसभा मधील पाषाण-सुतारवाडी लिंक रोड वरील कचऱ्यावरून राजकारण पेटले! अमोल बालवडकरांच्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे; पण तत्परता फक्त ‘खास’ भागापुरतीच का?
सुस परिसर वाहतूक कोंडीबाबत अनिकेत चांदेरे यांच्याकडून वाहतूक पोलिसांना निवेदन
मैत्रीचा धागा, विश्वासाचे नाते! युवा स्पंदनतर्फे चतुःश्रुंगी व कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये फ्रेंडशिप डे उपक्रम