बालेवाडी :
प्रभाग क्रमांक ९ मधील बालेवाडी परिसरात परिवर्तनाची हाक देत काल एका उमेदवाराच्या प्रचारार्थ भव्य आणि उत्स्फूर्त पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेला स्थानिक रहिवाशी, सहकारी मित्र, कार्यकर्ते आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
“आता वेळ परिवर्तन घडवण्याची” या संदेशासह काढण्यात आलेल्या पदयात्रेमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आगामी निवडणुकीत बदलाची भूमिका स्पष्ट केली. बालेवाडीतील नागरिकांमध्ये प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी विकासाभिमुख, तरुण आणि सुशिक्षित लोकप्रतिनिधीची गरज असल्याचा ठाम मतप्रवाह यावेळी दिसून आला.
पदयात्रेदरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. स्थानिक प्रश्न, विकासाच्या अपेक्षा तसेच भविष्यातील नियोजन यावर सकारात्मक चर्चा झाली. नागरिकांनी उमेदवाराला भरभरून पाठिंबा देत परिवर्तनाच्या या लढाईत कायम साथ देण्याचा विश्वास व्यक्त केला.
नागरिकांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने प्रभाग क्रमांक ९ मध्ये विकासासाठी निश्चितच परिवर्तन घडवून आणले जाईल, असा विश्वास यावेळी उमेदवारांनी व्यक्त केला.



More Stories
राजभवन (लोकभवन) मार्ग विस्तारीकरणाला गती; कामाचा शुभारंभ, वाहतूक कोंडीवर लवकरच दिलासा – नगरसेवक सनी निम्हण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीचा मेणबत्ती मोर्चा