बाणेर :
पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक नऊमध्ये प्रचार दौरा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते संदीप बालवडकर आणि जयेश मुरकुटे यांनी विविध सोसायट्यांमध्ये नागरिकांसोबत बैठकांचे आयोजन केले. या बैठकींमधून त्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि प्रभागाच्या विकासाबाबत चर्चा केली.
या चर्चेदरम्यान सोसायटीतील नागरिकांनी सध्याच्या परिस्थितीत प्रभागात बदलाची गरज असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले. नियोजनबद्ध विकास, पायाभूत सुविधा, वाहतूक, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांवर प्रभावीपणे काम करणारा सुशिक्षित व सक्षम उमेदवार मिळावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
नेते संदीप बालवडकर आणि जयेश मुरकुटे यांनी नागरिकांच्या सूचनांची व समस्यांची नोंद घेत, प्रभागाच्या सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकासासाठी पक्षाच्या माध्यमातून ठोस प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. नागरिकांशी झालेला हा थेट संवाद आगामी निवडणुकीत परिवर्तनाचा संकेत देणारा ठरत असल्याचे चित्र या बैठकीतून दिसून आले.


More Stories
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीचा मेणबत्ती मोर्चा
गायनातून भाव व्यक्त होणे अत्यावश्यक : पं. उपेंद्र भट सोमेश्वर फाउंडेशनतर्फे २४ व्या ‘पुणे आयडॉल- 2026’ स्पर्धेचे उद्घाटन