बालेवाडी :
बालेवाडीतील साई चौक परिसरात 2023 मध्ये तब्बल 1 कोटी रुपये खर्चून बांधलेली भाजी मांडई आजही बंद अवस्थेत आहे. सार्वजनिक निधी वापरून उभारलेले हे काम वापरात न आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. जनतेच्या पैशातून उभारलेली भाजी मंडई सुरू का केली जात नाही. यासाठी जयेश मुरकुटे यांनी पुढाकार घेत नागरिकांच्या हक्कासाठी पुढे होऊन नागरिकांना सोबत घेऊन जनआंदोलन निर्णय घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार चे कोथरूड विधानसभा कार्याध्यक्ष जयेश संजय मुरकुटे यांनी “चला तर मग प्रश्न विचारुया” या घोषवाक्याखाली नागरिकांसह जनआंदोलन करणार आहेत. या आंदोलनाचे आयोजन 30 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9:00 वाजता साई चौक, बालेवाडी येथे करण्यात आले आहे.
पोस्टरमधून जयेश मुरकुटे यांनी स्पष्ट संदेश दिला आहे —
“आपले 1 कोटी पाण्यात? कारण आपण विचारतच नाही!”
या जनआंदोलनाद्वारे स्थानिक प्रशासनाकडे या प्रकल्पाबाबत उत्तरदायित्वाची मागणी केली जाणार असून, नागरिकांना सक्रिय सहभागाचे आवाहन जयेश मुरकुटे यांच्या वतीने करण्यात आले आहे.




























More Stories
कोथरूड विधानसभा मधील पाषाण-सुतारवाडी लिंक रोड वरील कचऱ्यावरून राजकारण पेटले! अमोल बालवडकरांच्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे; पण तत्परता फक्त ‘खास’ भागापुरतीच का?
सुस परिसर वाहतूक कोंडीबाबत अनिकेत चांदेरे यांच्याकडून वाहतूक पोलिसांना निवेदन
मैत्रीचा धागा, विश्वासाचे नाते! युवा स्पंदनतर्फे चतुःश्रुंगी व कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये फ्रेंडशिप डे उपक्रम