बाणेर :
आंतराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने यावर्षीचा राज्यस्तरीय “दीपस्तंभ पुरस्कार” श्रीराम समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेला फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
श्रीराम समर्थ पतसंस्थेने महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीत दीपस्तंभा प्रमाणे कार्य करून सहकार चळवळीला मार्गदर्शक दिशा दर्शविली आहे असे काकासाहेब कोयटे यांनी यावेळी सांगितले.
संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक दत्तात्रय तापकीर, कार्याध्यक्ष विवेक कळमकर, संचालक सुधाकर धनकुडे, हृषिकेश तापकीर, मुख्य व्यवस्थापक संतोष कोलते यांनी स्विकारला.
संस्थेचे संस्थापक दत्तात्रय तापकीर यांनी सांगितले की, संस्थेच्या प्रगतीमध्ये संस्थेचे संचालक, स्टाफ व खातेदार यांचा मोलाचा वाटा आहे, त्यांच्यामुळेच आज संस्थेला पुरस्कार प्राप्त झाला आहे.


More Stories
“उच्च तंत्र की तंत्रमंत्र? अमोल बालवडकरांचा भोंदू खरात सोबत फोटो वरून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा”
औंध ग्रामदैवत भैरवनाथ महाराज उत्सव ३ मे रोजी; ग्रामसभेत तारीख जाहीर
लहानग्यांच्या स्वप्नांना मिळाले पंख: पेरिविंकल पिरंगुटमध्ये सीनियर केजी ग्रॅज्युएशन डे जल्लोषात साजरा!!!