माढा (जि. सोलापूर):
अलीकडील अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती मुळे बाधित झाल्याने अडचणीत सापडलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी पुणे जिल्ह्यातील महाळुंगे (ता. मुळशी ) गावकऱ्यांनी पुढाकार घेत मदतीचा हात पुढे केला आहे.
महाळुंगे ग्रामस्थांच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील केवडगाव येथील शेतकऱ्यांना २०० अन्नधान्य किट सुपूर्द करण्यात आले. ही मदत केवडगावाचे सरपंच श्री. राजेंद्र पाटील आणि उदरगावाचे सरपंच श्री. अतुल म्हस्के यांच्या मार्फत गावातील शेतकरी बांधवांना देण्यात आली.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिलासा उमटला असून महाळुंगे ग्रामस्थांच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. “शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात आपण सर्वांनी एकत्र यायला हवे,” असा संदेश या उपक्रमातून दिला गेला.



More Stories
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप….
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सूस येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोपसमारंभ सोहळा संपन्न.
“शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कार घडले तरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते” – मा. आमदार शरद ढमाले