बालेवाडी :
यंदाच्या गणेशोत्सवामध्ये बालेवाडी येथील श्री. शिवराज मित्र मंडळाने आपल्या ३२ व्या वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्ताने मंडळाने यंदा शिव मंदिराचा भव्य देखावा सादर केला असून, पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
यावर्षी गणेशोत्सवात मंडळाने ‘डीजे मुक्त’ गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणूकही ढोल-ताशा पथकाच्या गजरात काढण्यात येणार असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.श्री.शिवराज मित्र मंडळ यंदाचे मंडळाचे अध्यक्ष – कु.प्रसाद भरत बालवडकर हे आहेत.
मंडळाने सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना विशेष प्राधान्य दिले आहे. गेल्या ८ वर्षांपासून ‘सन्मान स्त्री शक्तीचा’ या उपक्रमांतर्गत महिलांसाठी महाआरतीचे आयोजन केले जाते. यावर्षी शुक्रवार, ५ सप्टेंबर रोजी ही महाआरती होणार असून, यात परिसरातील शेकडो महिला सहभागी होऊन गणरायाची मनोभावे पूजा करतात.
या व्यतिरिक्त, मंडळाने सामाजिक भान जपत विविध उपक्रम राबवले आहेत. यामध्ये गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, आरोग्य शिबिर, मोफत नेत्र तपासणी शिबिर आणि गणेश जयंतीनिमित्त महाप्रसादाचे वाटप केले जाते.
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांमध्ये मंडळाकडून महिलांसाठी खास ‘खेळ पैठणीचा’ आणि लहान मुलांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. या खेळांमधील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरवले जाते. तसेच परिसरातील विविध पुरुष व महिला भजनी मंडळांच्या उपस्थितीमध्ये भजन संध्या चे आयोजन केले आहे. या सर्व उपक्रमांमुळे बालेवाडीमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.



More Stories
लहानग्यांच्या स्वप्नांना मिळाले पंख: पेरिविंकल पिरंगुटमध्ये सीनियर केजी ग्रॅज्युएशन डे जल्लोषात साजरा!!!
“विद्युत विभागाची धडक कारवाई: बाणेर परिसरात २८०० मीटर अनधिकृत केबलवर कारवाई”
जागतिक कॅरम विजेती रश्मी कुमारी यांच्या हस्ते ‘नॅशनल पीएनजी ड्राईव्ह २.०’ अंतर्गत पीएनजी पुरवठ्याचा औंधमध्ये शुभारंभ