बालेवाडी :
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राहुल दादा बालवडकर जनसंपर्क कार्यालय, दसरा चौक, बालेवाडी येथे खास गणपती विसर्जन तालाव उभारण्यात आला आहे. पर्यावरणपूरक पद्धतीने गणरायाचे विसर्जन व्हावे या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला असून, पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
राहुल दादा बालवडकर यांनी सांगितले की, “नदी-नाले प्रदूषित होऊ नयेत आणि आपले जलस्रोत स्वच्छ राहावेत यासाठी नागरिकांना पर्यायी सोय उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. विसर्जन तालावामुळे भक्तांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात गणरायाला निरोप देणे शक्य झाले आहे.”
नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून पुढील काही दिवसांत अधिकाधिक विसर्जन या तालावात होईल अशी अपेक्षा आहे.





























More Stories
सुस परिसर वाहतूक कोंडीबाबत अनिकेत चांदेरे यांच्याकडून वाहतूक पोलिसांना निवेदन
मैत्रीचा धागा, विश्वासाचे नाते! युवा स्पंदनतर्फे चतुःश्रुंगी व कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये फ्रेंडशिप डे उपक्रम
*”‘मोठी स्वप्ने पाहा… भारत घडवा!’ — भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणादायी विचारांचा वारसा बावधन येथील पेरीविंकल च्या विद्यार्थ्यांपर्यंत !!!!*