बालेवाडी :
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राहुल दादा बालवडकर जनसंपर्क कार्यालय, दसरा चौक, बालेवाडी येथे खास गणपती विसर्जन तालाव उभारण्यात आला आहे. पर्यावरणपूरक पद्धतीने गणरायाचे विसर्जन व्हावे या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला असून, पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
राहुल दादा बालवडकर यांनी सांगितले की, “नदी-नाले प्रदूषित होऊ नयेत आणि आपले जलस्रोत स्वच्छ राहावेत यासाठी नागरिकांना पर्यायी सोय उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. विसर्जन तालावामुळे भक्तांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात गणरायाला निरोप देणे शक्य झाले आहे.”
नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून पुढील काही दिवसांत अधिकाधिक विसर्जन या तालावात होईल अशी अपेक्षा आहे.



More Stories
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीचा मेणबत्ती मोर्चा
गायनातून भाव व्यक्त होणे अत्यावश्यक : पं. उपेंद्र भट सोमेश्वर फाउंडेशनतर्फे २४ व्या ‘पुणे आयडॉल- 2026’ स्पर्धेचे उद्घाटन