बालेवाडी :
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राहुल दादा बालवडकर जनसंपर्क कार्यालय, दसरा चौक, बालेवाडी येथे खास गणपती विसर्जन तालाव उभारण्यात आला आहे. पर्यावरणपूरक पद्धतीने गणरायाचे विसर्जन व्हावे या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला असून, पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
राहुल दादा बालवडकर यांनी सांगितले की, “नदी-नाले प्रदूषित होऊ नयेत आणि आपले जलस्रोत स्वच्छ राहावेत यासाठी नागरिकांना पर्यायी सोय उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. विसर्जन तालावामुळे भक्तांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात गणरायाला निरोप देणे शक्य झाले आहे.”
नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून पुढील काही दिवसांत अधिकाधिक विसर्जन या तालावात होईल अशी अपेक्षा आहे.



More Stories
लहानग्यांच्या स्वप्नांना मिळाले पंख: पेरिविंकल पिरंगुटमध्ये सीनियर केजी ग्रॅज्युएशन डे जल्लोषात साजरा!!!
“विद्युत विभागाची धडक कारवाई: बाणेर परिसरात २८०० मीटर अनधिकृत केबलवर कारवाई”
जागतिक कॅरम विजेती रश्मी कुमारी यांच्या हस्ते ‘नॅशनल पीएनजी ड्राईव्ह २.०’ अंतर्गत पीएनजी पुरवठ्याचा औंधमध्ये शुभारंभ