बाणेर :
वाढते शहरीकरण, बदलते हवामान आणि दिवसेंदिवस कमी होत चाललेली हिरवळ यामुळे पर्यावरण संवर्धनाची गरज अधिक तीव्र झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राजाभाऊ गुडदे फाउंडेशन, बालेवाडी यांच्या वतीने २९ ऑगस्ट रोजी तुकाई टेकडी येथे वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या उपक्रमाला वसुंधरा अभियानाच्या सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी फाउंडेशनच्या अध्यक्षा किरण गुडदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, “केवळ वृक्षारोपण करणे पुरेसे नसून, लावलेल्या प्रत्येक रोपाचे संगोपन व संरक्षण करणे तितकेच महत्त्वाचे आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे,” असे सांगितले.
तुकाई टेकडी परिसर अधिक हिरवागार करण्याच्या उद्देशाने विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणासोबतच लावलेल्या झाडांचे नियमित संगोपन व संरक्षण करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला. ‘झाडे लावा, झाडे जगवा आणि पर्यावरण वाचवा’ या संदेशातून नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
🌳 वाढदिवसाच्या निमित्ताने निसर्गाला अनोखी भेट
या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे काही कुटुंबांनी आपल्या वाढदिवसाचा आनंद पर्यावरण संवर्धनाशी जोडला. उपस्थित मित्रपरिवारातील अद्विक चिन्नी यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत कुटुंबीयांसोबत विविध आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची लागवड केली. वाढदिवसाची कायमस्वरूपी आठवण म्हणून झाडे लावण्याचा त्यांचा हा उपक्रम पर्यावरणप्रेमाचा आदर्श ठरला.
तसेच श्री. पराग मोरे यांनी त्यांचा मुलगा चि. जॅक मोरे याच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त कुटुंबीयांसोबत विविध फळझाडांची लागवड केली. यावेळी त्यांनी जॅकला वृक्षारोपणाचे महत्त्व समजावून सांगत निसर्गाचे जतन आणि संवर्धन करण्याचा संस्कार दिला.
‘वाढदिवस साजरा करूया, झाडे लावून निसर्ग जपूया’ या संकल्पनेतून साजरा झालेला हा उपक्रम आनंदाच्या प्रसंगाला सामाजिक आणि पर्यावरणीय जबाबदारीची जोड देणारा ठरला.
या वृक्षारोपण उपक्रमाला संगीत गुडदे, धनंजय गवारे, दर्शना गवारे, विपुल शिंदे, मनोज माने, अमोल बागडिया, भरत चिन्नी, कृष्णा रेड्डी, अद्विक चिन्नी, दिविथा रेड्डी, अमित मालोकर, चेनाराम पटेल, अभिजीत भाटकर, प्रांजू गुल्हाणे, ध्रुव सारडा, संपदा वांगे, प्रियांका खरे, नेल्सन दंडे, जॅक पराग मोरे आणि मंगेश वाघमारे यांचे सहकार्य लाभले.
वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच, प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील विशेष प्रसंग एखादे झाड लावून साजरा करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. वाढदिवसाच्या आनंदाला निसर्ग संवर्धनाची जोड देणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला.
या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या वसुंधरा अभियानाच्या सर्व सदस्यांसह मित्रपरिवाराचे राजाभाऊ गुडदे फाउंडेशनच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.





























More Stories
*नामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता* *पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची ना. चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा*
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पिरंगुट येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा
*राखीच्या धाग्यातून जपली माणुसकी; बावधनच्या पेरीविंकल विद्यार्थ्यांनी सावलीतील बालकांसोबत साजरे केले रक्षाबंधन!*